आदित्य ठाकरे यांना इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका, अधिवेशनासाठी जाण्याचं तिकीट रद्द, आता…

SHARE:

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनादेखील इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा फटका बसला आहे. गेल्या तीन ते चार तासांपासून इंडिगो एअरलाईन्सचे शेकडो विमानं रद्द झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रचड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. प्रवाशांची विमानतळावर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. इंडिगोच्या अशा विमानसेवेचा फटका केवळ सर्वसामान्य प्रवाशांनाच नाही तर आता नेतेमंडळींनादेखील बसत असल्याचं बघायला मिळत आहे.

विधीमंडळाचं उद्यापासून हिवाळी अधिवेशन

विधीमंडळाच उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. परंपरेनुसार हे अधिवेशन नागपूरला पार पडणार आहे. या अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागांमधील मंत्री आणि आमदार नागपूरच्या दिशेला रवाना झाले आहेत. त्यासाठी ते विमानाचा वापर करतात. पण इंडिगोच्या गोंधळाचा फटका आमदारांना बसताना दिसतोय. आदित्य ठाकरे यांनादेखील इंडिगोच्या गोंधळाचा फटका बसला आहे.

आदित्य ठाकरे यांची फ्लाईट रद्द

आदित्य ठाकरे हे विमानाने मुंबईला जाणार आहेत. त्यांनी मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी इंडिगो फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं. पण इंडिगोच्या सेवेच्या गोंधळामुळे त्यांची ती फ्लाईट रद्द झाले. यामुळे आदित्य ठाकरे यांना आता आज रात्री दुसऱ्या फ्लाईटने नागपूरला जावं लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता आदित्य ठाकरे एअर इंडियाच्या फ्लाईटने नागपूरला जाणार आहेत.

इतर आमदारांची सुद्धा विमान तिकिटं रद्द

इंडिगो विमानाचं तिकीट रद्द होणारे आमदार केवळ आदित्य ठाकरे हे एकटे नाहीत. तर अनेक आमदारांचं नागपूरला जाणाऱ्या इंडिगो विमानाची तिकीटं रद्द झाली आहेत. अखेर आमदारांना रेल्वे आणि रस्ते मार्गाने प्रवास करण्याची वेळ आली.

आमदार नागपुरात कसे पोहोचत आहेत?

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांना चार्टड विमानाचा पर्याय निवडल्याची माहिती आहे. तर कोकणातील शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव हे विमान नसल्याने ट्रेनने नागपूरला पोहोचले. तर मंत्री संजय राठोड, शिवसेना उबाठा नेते अनिल परब यांनीही रेल्वेचा पर्याय निवडला. तर काही नेते समृद्धी महामार्गाने स्वत:च्या गाडीने नागपूरला पोहोचले.

आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केली खंत

शिवसेना उबाठा नेते सचिन अहिर यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या माहितीनुसार, सत्ताधारी आमदारांसाठी खासगी विमानांची व्यवस्था केली गेली आहे. एका बाजूला प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते, दुसऱ्या बाजूला इंडिगो सारखा विषय आपल्या अखत्यारित नसल्याचं राज्य सरकार म्हणत आहे”, अशी खंत सचिन अहिर यांनी व्यक्त केली आहे.

इंडिगोचा गोंधळ का सुरु?

“इंडिगोने नियम न पाळल्यामुळे संकट ओढावलं”, असं केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. दरम्यान, इंडिगोने सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा फटका आजही बसत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा