
संत कृपा झाली l इमारत फळा आली ll
तुका म्हणे, शोभा सांगे… महाराष्ट्राला ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंतमोठी संत परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, यासारख्या साध्या विधानाला वचनाचा दर्जा प्राप्त व्हावा, इतकी यथार्थता या साध्या विधानात दडलेली आहे. महाराष्ट्रास मराठी भाषिक संतांची आणि मराठी संत वांड्मयाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या पूर्वीही वारकरी पंथ आणि पंढरपूरच्या वारीची















































