‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ १७ वर्षांनी होणार बंद? असित मोदी म्हणाले-‘टीम खूप मेहनत घेतेय…’

SHARE:

मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. गेल्या १७  वर्षांपासून सुरू असणाऱ्या या मालिकेने मोठा चाहतावर्ग कमावला. यातील प्रत्येक पात्राने देशभरात लोकप्रियता मिळवली आहे. जेठालाल, दयाबेन, गोकुळधाम सोसायटीमधील सर्व मंडळी असो किंवा टप्पू सेना… ही पात्रे घराघरात प्रसिद्ध झाली. मात्र, अलिकडेच अशी अफवा पसरली आहे की, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ लवकरच बंद होणार आहे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ च्या प्रेक्षकांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे, आता याविषयी निर्माते असित कुमार मोदी यांनी भाष्य केले. त्यांनी हा शो किती काळ चालू ठेवण्याची त्यांची योजना आहे हे उघड केले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही २००८ पासून सुरू झालेली मालिका आहे. १७  वर्षांपासून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तेव्हापासून ही मालिका भारतातील सर्वात आवडत्या मालिकांपैकी एक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मालिकेमधून अनेक कलाकारांनी एक्झिट घेतली. मालिकेच्या सेटवरुन अनेक वादही समोर आले. त्यामुळे मालिकेसंदर्भात प्रेक्षकांची नाराजी वाढली होती आणि आता काळात शो बंद होणार की काय, अशी चर्चा रंगली.

शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी अलिकडेच बोलताना ही मालिका किती काळ चालेल याचा खुलासा केला. त्यांनी इंडियन टेलिव्हिजन अकादमीच्या २५ व्या वर्धापन दिन सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी या चर्चेविषयी भाष्य केले.

नेमकं काय म्हणाले असित मोदी ?

असित यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘हा शो अजूनही चालू आहे आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही ही मालिका करू. मला वाटते की, ही मालिका अजूनही प्रेक्षकांना आवडते आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा एकमेव असा शो आहे, जो हास्य आणि आनंद देतो. मला आनंद आहे की लोक तो इतक्या उत्सुकतेने पाहतात. हा फक्त एक शो नाही, तर तो एक ब्रँड आहे, ज्यावर प्रेक्षकांनी प्रेम केले. मी ही मालिका तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि माझी टीम देखील खूप मेहनत घेते.’

 

Leave a Comment

अधिक वाचा