खरगोन – मध्य प्रदेशात किरकोळ कारणावरून, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम करण्यात आले. मुस्लिम मुलीच्या पायावर चुकुन पाय पडल्यामूळे मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम करण्यात आला होता. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात, एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून, झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आहे. या किरकोळ कारणावरून 3 तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे पडसाद उमटताच, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मध्यप्रदेशातील हे संपूर्ण प्रकरण, एका प्रवासी बसमधील प्रवाशांमधील, वादाशी संबंधित आहे. इंदूरहून खरगोनकडे येणारी शारदा ट्रॅव्हल्सची प्रवासी बस, खलघाट येथील महावीर हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबली. हॉटेलमध्ये एका तरुणाने चुकून एका मुस्लिम समुदायाच्या मुलीच्या पायावर पाऊल ठेवले. या वादात,मुस्लिम समुदायाच्या ३ तरुणांनी हिंदू मुलाला मारहाण केली. ही धटना व्हायरल झाल्यामूळे स्थानिक हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले, आणि त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला. संतापलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे संतप्त झालेल्या लोकांनी, थेट पोलीस स्टेशनला घेराव घातला. आंदोलकांनी राज्य महामार्ग अडवून धरल्याने दोन्ही बाजूंनी, अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी संबंधित पोलीस स्टेशन प्रभारींना, तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी लावून धरली.
महामार्गावरील हा रास्तारोको रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कडाक्याच्या थंडीत अनेक किलोमीटर, वाहतूक कोंडी झाल्यामुळे बस आणि खाजगी वाहनांमधील प्रवाशांचे, लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांशी चर्चा करून आणि दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर, महामार्ग मोकळा करण्यात आला.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवली होती. बसमधील इतर प्रवाशांनी परिस्थिती शांत केली. हॉटेलपासून बस पुढे जात असतानाच, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अरिहंत नगरजवळ ती बस थांबवली. दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले, ज्यांनी बस कासरावड पोलिस ठाण्यात नेली. पोलिस ठाण्यात झालेल्या चर्चेनंतर, स्टेशन प्रभारी राजेंद्र बर्मन यांनी तरुणांना उतरवले आणि चालकाला बस पुढे नेण्याची परवानगी दिली. बस सोडल्यानंतर संघटनेने निषेध केला. ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडले आणि समोरील जयस्तंभ चौकात जमले. त्यांनी स्टेशन प्रभारी राजेंद्र बर्मन यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली.
जमावाला पांगवण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. यानंतर कसरावाडमधील परिस्थिती तापली. यानंतर अतिरिक्त एसपी शकुंतला रुहल, एसडीओपी श्वेता शुक्ला यांच्यासह अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस दल कारावाड पोलिस ठाण्यात पोहोचले, आणि शिष्टमंडळाशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री ३ वाजेपर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात आणि जयस्तंभ चौकात मोठी गर्दी जमली होती. अर्ज सादर केल्यानंतर चौकशी केली जाईल असे, अतिरिक्त एसपी यांनी सांगितले. सध्या मध्यप्रदेशातील खरगोन परिसरात शांतता असून खरगोन पोलीस अधिक तपास करत आहे.




