जगभरातील ५५ देशांमध्ये भारतीय नागरिकांना, व्हिसा फ्री फिरता येणार

SHARE:

नवी दिल्ली – जगभरातील ५५ देशांमध्ये भारतीय नागरिकांना, व्हिसा-फ्री व व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेने फिरता येणार आहे. भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार आहे, तर आता भारतीय पासपोर्टला ताकद मिळाली आहे.

भारतीय पासपोर्टच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे, तर भारत आता ८० व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच पायऱ्यांची मोठी झेप घेतली आहे. तर आता भारतीय नागरिकांना जगभरातील ५५ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधेद्वारे प्रवास करता येणार आहे. भारताची ही प्रगती देशाच्या मजबूत होत असलेल्या, आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक मानली जात आहे.

या जागतिक क्रमवारीत सिंगापूर १९२ देशांच्या, सुविधेसह पहिल्या स्थानावर आहे, तर जपान आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानी आहेत. भारताने आपल्या शेजारील देशांच्या तुलनेत, मोठी आघाडी घेतली आहे. तर पाकिस्तान ९८ व्या तर बांगलादेश ९५ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. भारतीय पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले थायलंड, मलेशिया आणि मॉरिशस यांसारख्या देशांनी , भारतीय पर्यटकांना व्हिसाच्या अडचणीतून मुक्त केले आहे. यामुळे आता कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय, केवळ पासपोर्ट घेऊन जगभरातील ५५ देशांची सफर करणे शक्य होणार आहे.

या वाढीव सुविधेचा फायदा आशिया, आफ्रिका, ओशनिया, कॅरिबियन आणि मध्य पूर्वेतील अनेक भागांमधील भारतीय प्रवाशांना होईल. लोकप्रिय व्हिसा-मुक्त देशांमध्ये थायलंड, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ, बार्बाडोस, फिजी, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि इतर समावेश आहे. व्हिसा-ऑन-अरायव्हल देशांमध्ये इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, केनिया, जॉर्डन आणि फिलीपिन्स यांचा समावेश आहे.

या सुविधेमुळे आता फॅमिली ट्रिप, हनिमून किंवा सुट्टयांच्या सहलींचे नियोजन करणे, भारतीयांसाठी अधिक सुलभ होईल. प्रत्येक देशामध्ये राहण्याचा कालावधी, हा १५ दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत वेगवेगळा असू शकतो. ही बाब खरी असली तरी, पर्यटकांनी एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. की हे नियम आंतरराष्ट्रीय धोरणांनुसार बदलू शकतात, त्यामुळे प्रवासापूर्वी संबंधित देशाच्या, अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासून घेणे सोयीचे ठरेल. युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांसाठी अद्याप व्हिसाची गरज आहे. तरी जगभरातील ५५ देशांनी दिलेली ही , भारतीय पर्यटकांच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा पुरावा आहे.

जेव्हा आपण परदेश प्रवासाचा विचार करतो, तेव्हा व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सर्वात कठीण असते. मात्र आता अंगोला, बार्बाडोस, भूतान, फिजी, जमैका, कझाकिस्तान, नेपाळ आणि सेनेगल यांसारख्या देशांमध्ये, भारतीय पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. याशिवाय इंडोनेशिया, मालदीव, श्रीलंका, कंबोडिया, कतार आणि सेशेल्स यांसारख्या देशांमध्य,े पोहोचल्यानंतर विमानतळावरच व्हिसा मिळण्याची सोय, उपलब्ध करून देण्यात आली आहे. केनिया आणि म्यानमार सारख्या देशांनी, इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन म्हणजेच ई-व्हिसाची सुविधा दिली आहे, ज्यामुळे घरबसल्या ऑनलाइन परवानगी मिळवणे सोपे झाले आहे. आता भारत देशातील नागरिकांना जगभरातील 55 देशामध्ये व्हिसा-फ्री फिरता येणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा