दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या या वॉर-ड्रामा चित्रपटानं सुरुवातीला चांगली उत्सुकता निर्माण केली होती. मात्र, ‘धुरंधर’ आणि ‘अवतार: फायर अँड ॲश’ सारख्या मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेमुळं याला अपेक्षित यश मिळवता आलेंनाही.
या सिनेमाची आतापर्यंत एकूण जागतिक कमाई ₹३३.७० कोटी इतकी झाली आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिसवरचा हा आकडा फक्त २६ कोटी इतकाच आहे.
तर सिनेमातला जयदीप अहलावतचा करारी अंदाज चर्चेत असला तरी, बॉक्स ऑफिसवर मात्र ते दिसून येत नाहीये.नेहमीप्रमाणे जयदीप अहलावत यानं आपल्या भूमिकेत जीव ओतला असून, धर्मेंद्र यांच्यासोबतचे त्याचे सीन्स चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.चित्रपटातील रणगाड्यांच्या युद्धाचे सीन्स अत्यंत वास्तववादी असल्याचं म्हटलं जात आहे. कैलाश खेर यांचे संगीत आणि पार्श्वसंगीताचंही कौतुक होताना दिसतंय.
का ठरला ‘फ्लॉप’?
६० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट आपली मूळ बजेट वसूल करण्यात अपयशी ठरला आहे. ट्रेड विश्लेषकांच्या मते, चित्रपटाची कथा संथ असणं आणि काही तांत्रिक त्रुटींमुळं प्रेक्षकांनी याकडं पाठ फिरवली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटां २१.५० कोटींची कमाई केली होती, मात्र दुसऱ्या आठवड्यात या कमाईत ८०% घट होऊन ती केवळ ₹४.५० कोटींवर आली.
धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट
हा चित्रपट दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. कारण हा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचा शेवटचा ऑन-स्क्रीन परफॉर्मन्स होता. परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित या कथेत अगस्त्य नंदानं त्यांची भूमिका साकारली आहे.




