नवी दिल्ली – गेल्या अनेक वर्षांपासून देशात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी होत असताना तेलंगणा सरकारने नगरपालिका आणि महानगर पालिकेच्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर तेलंगणात नगरपालिका आणि महानगर पालिकेच्या निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात आल्या. ज्यात जे निकाल आले ते धक्कादायक आहे. या निवडणूकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला तर, बीआरएसला मोठा धक्का बसला असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे.
तेलंगणा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने विरोधी पक्ष बीआरएस आणि भाजपला लक्षणीयरीत्या मागे टाकले आहे. तेलंगणामधील नगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात आल्या. ११ फेब्रुवारी रोजी ११६ नगरपालिका आणि ७ महानगरपालिकांसाठी एकूण २,९९६ वॉर्डांसाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान झाले. तेलंगणा नगरपालिका निवडणुकीचे निकाल खूपच आश्चर्यकारक आहेत.
काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. तर, दुसरीकडे बीआरएसला मोठा धक्का बसला असून भाजपचा दारूण पराभव झाला आहे.
तेलंगणात पुन्हा सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांनी, काँग्रेस पक्षाने तेलंगणा नगरपालिका निवडणुकीत आपले स्थान मजबूत केले आहे. तसेच पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तेलंगणा नगरपालिका निवडणुकीचे निकाल काँग्रेस पक्षासाठी खूप महत्वाचे मानले जात आहेत.
तेलंगणाच्या नगरपालिका आणि महानगर पालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने १,५३७ वॉर्डांमध्ये निर्णायक विजय मिळवला आहे. कांगेस पक्षाने ११६ नगरपालिकांपैकी किमान ८३ आणि सातपैकी पाच महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला आहे.
बीआरएस या पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षाने ७८१ वार्ड आपल्याकडे कायम ठेवले आहे. याशिवाय, बीआरएसने १५ नगरपालिका काबीज केल्या. दारूण पराभव झालेल्या भाजपला केवळ ३३६ वार्डात विजय मिळवता आला आहे. खासदार असदुद्दिन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम या पक्षाने ७० वार्डात विजय मिळवला आहे. सीपीआयला १३, इतर ७३ आणि अपक्ष उमेदवारांनी १८३ वार्डात विजय मिळवला आहे.




