
मनोरंजन विश्व् – ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये अर्जुन उठायला कंटाळा करत असतो त्यामुळे सायली वैतागलेली असते. सायली त्याला जबरदस्ती उठवते आणि मग त्याला बर्थडे विश करते. आज सायली आणि अर्जुन चा वाढदिवस असतो. खरंतर सायलीचा बर्थडे त्याच दिवशी झालेला ज्या दिवशी प्रियाचा बर्थडे साजरा केलेला. पण तिला तो दिवस आठवत नसतो त्यामुळे ज्या दिवशी ती मधु भाऊंना सापडते तो दिवस ती वाढदिवस म्हणून साजरा करते. सायली अर्जुनला म्हणते की आपण लवकर खाली जाऊया कारण सगळे औक्षणासाठी वाट पाहत आहेत. कल्पना सुद्धा प्रतिमा आणि रविराज ला सायली व अर्जुनच्या वाढदिवसाच्या आमंत्रण देते. सुभेदार सर्वजण घर सजवत असतात.
दुसरीकडे प्रिया महिपत चा शोध घेण्यासाठी त्याच्या घरी जाते. पण तिथे पोलिसांचा बंदोबस्त असतो त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात महिपत घरात राहणार नाही याची तिला खात्री पटते. आजूबाजूला पाहत असताना प्रियाची नजर साक्षीवर पडते. साक्षी आपल्या अण्णांना पाहण्यासाठी तिच्या घरी आलेली असते. दोन दिवस महिपतचा फोन वगैरे काही आलेला नसतो त्यामुळे ती बेचैन झालेली असते. प्रिया साक्षीला पाहिल्यावर फार अचंबित होते. ती लगेच अजून नागराज ला फोन करते आणि म्हणते की तुम्ही अजून माझ्यापासून काय काय लपवलं आहेत. साक्षी मेली असं तुम्ही मला सांगितलं होतं. साक्षी माझ्यासमोर उभी आहे.
आधी नागराज तिला खरं सांगायला टाळाटाळ करतो पण प्रिया म्हणते की जर आपल्याला महिपत चा शोध घ्यायचा असेल तर साक्षीचा माग काढावाच लागणार. तेव्हा नागराज तिला म्हणतो की माझं आणि महिपतचं ठरलेलं की साक्षी जिवंत आहे हे कोणाला सांगायचं नाही. मग प्रिया त्याला साक्षीच्या पत्त्यावर जायला सांगते आणि महीपत तिथेच असेल अशी मला खात्री आहे त्यामुळे तुम्ही त्याला शोधा असे म्हणते.
प्रियाने सांगितल्याप्रमाणे नागराज साक्षी कडे जातो. पण साक्षी स्वतः अण्णांचा काही पत्ता लागत नसल्यामुळे अस्वस्थ असल्याचं त्याला दिसतं. ती त्याला म्हणते की तुम्हाला सुद्धा माहित नाही का अण्णा कुठे आहे? त्यांचा फोन स्विच ऑफ आहे. ते मेसेजला रिप्लाय सुद्धा देत नाहीत मग मी काय करायचं. इतक्यात तिला एका अनोळखी नंबर वरून फोटो येतो. नागराज ला खात्री असते की महिपत आपल्या मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणारच. तो साक्षीकडे तिचा फोन मागतो. त्यावर एका नंबर प्लेटचा फोटो असतो ज्यावर सोलापूरच्या पत्त्याचा क्रमांक दिलेला असतो. तेव्हा त्याला समजतं की महिपत सोलापुरात लपला आहे.
‘ठरल तर मग’ मध्ये दुसरीकडे अर्जुन आणि सायली चा वाढदिवस साजरा होत असतो. पण अर्जुन ला ओवाळताना सायलीला लहानपणीच्या आठवणी दिसत असतात त्यामुळे तिला खूप त्रास होतो. प्रतिमा म्हणते की आजचा दिवस सायली आणि अर्जुन चा वाढदिवस आहे त्यामुळे तो चांगलाच जाणार. याच दिवशी आमचा अपघात झालेला ही गोष्ट मी आता पूर्णपणे विसरायची ठरवली आहे. अर्जुन सायलीला वाढदिवसानिमित्त खास दागिना देतो. त्यानंतर चैतन्य सायलीला म्हणतो की तू सुद्धा अर्जुनला असं काहीसं गिफ्ट द्यायचं जे आम्ही कोणीच देऊ शकत नाही. तेव्हा ती अर्जुन साठी खास गाणं म्हणते.
इतक्यात कल्पनाला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो. तिने सर्व सुभेदारांना आपल्या मुलाच्या लग्नाच आमंत्रण दिलेलं असतं. कल्पना सांगते की आम्ही सगळेजण येऊ शकत नाहीत पण सायली आणि अर्जुन नक्कीच येतील. त्यामुळे पुढच्या एपिसोड मध्ये सायली आणि अर्जुन सोलापुरात गेलेले पाहायला मिळतील.




