
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथून जवळच असलेल्या भानापूर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरुबा आव्हाळे (वय वर्ष ३५) यांनी आर्थिक विवंचना आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची ह्रदय द्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक अर्जुन आव्हाळे याच्याकडे ५८ गुंठे शेती होती. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातले संपूर्ण पीक नष्ट झाले. यामुळे सेंट्रल बँकेच्या कर्जासह खाजगी उसनवारीची ही परतफेड करणे अशक्य झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावखाली होते. दरम्यान २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गावलगतच असलेल्या स्वतःच्या शेतातील गोठ्यात त्यांनी विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात उपचार साठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा त्यादिवशी सायंकाळी सुमारे आठ वाजता मृत्यू झाला.
अर्जुन आव्हाळे यांच्या पश्चात पत्नी आई एक लहान मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबांचा कर्ता पुरुष अचानक गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषता त्याच्या चिमुकल्या मुलाचा डोक्यावरून पिृछत्र हरपल्याने गावात शोक काळा पसरली आहे. शासनाने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत कर्जमाफी द्यावी अन्यथा अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अशी टोकाचे निर्णय घेऊ नका..!
आर्थिक विवंचना कर्जबाजारीपणा सततची नापिकी अतिवृष्टी या गोष्टीमुळे आपल्या परिवाराला अंधारात सोडून कायमचे टोकाचे निर्णय घेऊ नका .अशा पद्धतीची मानसिक भावना बळीराजांमध्ये उभी करण्याची फार मोठी आवश्यकता आहे अशा टोकाच्या निर्णयामुळे आपण त्यातच घरातील कर्ता पुरुष निघून जात असेल. तर ते घर कायमस्वरूपी अंधारात पडून जाते .त्यामुळे ज्या पद्धतीने बळीराजा सतत झटत असतो निसर्गाशी दोन हात करत असतो .त्याच प्रकारे त्यांनी या टोकाच्या निर्णय आपल्यापर्यंत आपल्या डोक्यात विचार देखील येणार नाही. अशी भावना रूढ करणे आवश्यक आहे.




