उत्तर प्रदेश – रायबरेली येथे २१ जानेवारी रोजी झालेल्या एका हिंदुत्वाशी संबंधित कार्यक्रमात मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या नरसंहाराचे उघडपणे आवाहन करण्यात आले. याच्या एका आठवड्यानंतर सात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विराट हिंदू संमेलनात प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी दक्ष चौधरी, रिद्धिमा शर्मा, प्रकाश सिंग, अक्कू पंडित, अभिषेक ठाकूर, खुशबू पांडे आणि इतरांची नावे तक्रारीत नोंदवली आहेत.
रायबरेलीच्या शिवगड पोलीस स्टेशन परिसरातील कुंभी गावात एक अनधिकृत सनातन धर्म यात्रा आयोजित करण्यात आली होती, जिथे मुसलमान आणि ईसाई समुदायाविरोधात प्रक्षोभक विधाने करण्यात आली आणि शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. स्थानिक रहिवाश्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेक ठाकूर, दक्ष चौधरी, रिद्धिमा शर्मा, खुशबू पांडे आणि डॉ. प्रकाश सिंह यांच्यासह अनेक नामांकित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या व्हिडिओमध्ये जमाव हातात तलवारी घेऊन वादग्रस्त भाषणे देत ‘जय श्री राम’ असे म्हणत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आता फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३५३ (२ ) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
विराट हिंदू संमेलनात अनेक वक्त्यांनी धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण टिप्पणी केली, ज्यात ऋषिमा शर्मा यांचाही समावेश होता, त्या म्हणाल्या कि जर त्यांनी तुमच्या दोन लोकांना मारले तर तुम्ही शांतीच्या नावाखाली १०० जणांना मारा. लव्ह जिहाद षड्यंत्र सिद्धांताचा संदर्भ देत त्या म्हणाल्या कि जर त्यांनी तुमच्या एका हिंदू मुलीला पळवले तर तुम्ही त्यांच्या १०० मुली पळवा. मुस्लिम समुदायाची मोठी संख्या कमी केल्यास कोणतीही अडचण येणार नाही,. याचा अर्थ हिंसाचार स्वीकारणे असा होता.
याशिवाय अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध हिंसक द्वेषपूर्ण भाषणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या खुशबू पांडे यांनी ‘कोबी शेती’ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. हे १९८९ मध्ये बिहारमधील भागलपूर दंगलींकडे निर्देशित करते, जिथे लोगेन गावात किमान ११६ मुस्लिम पुरुषांना मारण्यात आले होते आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे मृतदेह कोबीच्या रोपांसह शेतात पुरण्यात आले होते.
दुसरे वक्ते, ठाकूर राम सिंग यांनी ख्रिश्चनांवर बेकायदेशीरपणे जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आणि दावा केला की त्यांची संख्या संपूर्ण भारतातील हिंदू गटांपेक्षा जास्त आहे. एका अज्ञात सहभागीने रहिवाशांना वस्त्यांमध्ये हिंदू महिला किंवा मुलींचे अपहरण करणाऱ्या जिहादी विरोधात सतर्क राहण्याचा इशारा दिला. अनेक वक्त्यांनी तथाकथितलव्ह जिहादपासून हिंदू महिलांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली आणि त्यात सहभागी असलेल्या मुस्लिम पुरुषांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.





