
मनोरंजन विश्व् – २००९ च्या ब्लॉकबस्टर ‘ ३ इडियट्स ‘ च्या सिक्वेलबद्दल बरीच चर्चा आहे. राजकुमार हिरानी यावर काम करत आहेत, असं सांगण्यात येतंय. तर काही रिपोर्ट्समध्ये म्हटलंय की, सिनेमात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा दिसणार आहेत. पण, तीन OG ‘इडियट्स’ पैकी दोन आमिर आणि माधवन यांनी आता सिक्वेलच्या चर्चांवर भाष्य केलं असून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आर. माधवन म्हणाला, ”३ इडियट्स’चा सीक्वल बनणं हे ऐकायला छान वाटतं. पण आमिर खान, शरमन आणि मी आम्ही तिघंही आता म्हातारे झालो आहोत. सीक्वल आला तरी आम्ही त्यात काय भूमिका करणार? आमचं आयुष्य कशाप्रकारे दाखवलं जाईल? ही एक चांगली कल्पना असू शकते. मात्र एका चांगल्या सीक्वलसाठी हे किती योग्य आहे हेदेखील पाहावं लागेल. मला राजकुमार हिराणींसोबत पुन्हा काम करायला आवडेल. मात्र ‘३ इडियट्स’ पुन्हा करणं हा मुर्खपणा ठरेल.’

‘3 इडियट्स’च्या सिक्वेलबद्दल आमिर खान काय म्हणाला?
आमिर खान म्हणाला, ”3 इडियट्स’चा सिक्वेल करू इच्छितो, पण त्यानं असंही म्हटलं की, अद्याप कोणीही त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. अभिनेता म्हणाला, ‘आम्हाला तो चित्रपट बनवण्यात खूप मजा आली! माझं पात्र, रँचो, माझं नेहमीचं आवडतं पात्र आहे. लोक अजूनही रँचोबद्दल बोलतात. तर, हो, मला सिक्वेल करायला आवडेल. पण कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही.’
‘३ इडियट्स’बद्दल सांगायचं तर, हा सिनेमा जगभरात ४०० कोटी रुपयांची कमाई करणारा आणि परदेशात बॉक्स ऑफिस कामगिरीसाठी एक नवीन बेंचमार्क सेट करणारा पहिला भारतीय चित्रपट होता. हा सिनेमा प्रेक्षक आजही आवर्जून आणि तितक्याच आवडीनं पाहतात. ‘३ इडियट्स’ हा सिनेमा बराच काळ भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट राहिला. या सिनेमात बोमन इराणी, करीना कपूर, ओमी वैद्य आणि मोना सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.




