जग युद्धाच्या मागे लागलेले असताना, भारताने इथे मोठा डाव साधला, थेट मोठा करार करत, घोषणा केली…

SHARE:

आंतरराष्ट्रीय : इराण आणि अमेरिका युद्दात न पडता आपल्या देशाचा कसा फायदा होईल, यावर सरकारचे लक्ष आहे. भारताने नुकताच दक्षिण कोरियासोबत काही महत्वाचे करार केले. व्दिपक्षीय संबंध वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. मोठ्या ६ घोषणाही करण्यात आल्या.

दक्षिण कोरियासोबत भारताने काही महत्वाचे करार केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे. म्युंग यांच्यात व्दिपक्षीय बैठक झाली. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत व्दिपक्षीय व्यापार दुप्पट करत ५० अरब डॉलरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच दोन्ही देशात ऊर्जा, प्राैद्योगिक, चिप, युद्धनाैका अशी १५ महत्वाची करार झाली. या करारावर दोन्ही देशांनी सह्या केल्या. यासोबतच महत्वाच्या सहा घोषणा देखील केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, दक्षिण कोरियासोबतचा करार अत्यंत महत्वाचा आहे. दोन्ही देशांनी डिएनए, बाजार अर्थव्यवस्था आणि करार केले. नरेंद्र मोदी यांनी बोलताना पुढे म्हटले की, दोन्ही देशातील व्दिपक्षीय व्यापार २७ अरब डॉलरपर्यंत पोहोचला. जो आता २०३० पर्यंत ५० डॉलर पर्यंत नेण्याचा आम्ही निर्णय घेतला.

व्यापार वाढवण्याकरिता दोन्ही देशांनी एक खास समितीची स्थापना देखील केली आहे. भारतात दक्षिण कोरियाच्या कंपन्यांना आणण्यासाठी खास प्लॅनही तयार आहे. त्यात लघु उद्योजक कंपन्या. भारत आणि दक्षिण कोरियात हजारो वर्षांचे जुने संबंध असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले. २०२८ मध्ये भारत दक्षिण कोरिया यांच्यात फ्रेंडशिप फेस्टिवल आयोजित केले जाणार आहे.

मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावण्यानंतर भारताने अनेक देशांसोबत व्यापार करार केले. युरोपियन युनियनसोबतही भारताने मोठा करार केला. मोठ्या टॅरिफनंतर अमेरिकेत जाणाऱ्या निर्यातीवर परिणाम झाला. हे नुकसान टाळण्यासाठी भारताने थेट जगातील अनेक देशांसोबत थेट मुक्तव्यापार केले.

भारताने टॅरिफमधून मार्ग काढण्यासाठी काही प्रयत्न केले. हेच नाही तर यादरम्यान भारताच्या मदतीला रशिया धावून आला होता. भारतीय वस्तूंसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली बाजारपेठ खुली केली. आता पुन्हा भारताने दक्षिण कोरियासोबत महत्वाचे करार केले. २०३० मध्ये हा व्यापार दुप्पट करण्याचा निर्णय दक्षिण कोरिया आणि भारताने घेतला आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या भरमसाठ टॅरिफनंतर अनेक देश थेटपणे भारताच्या मदतीला आली. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!