इतिहास सतत चालणारी प्रक्रिया, पाठ्यपुस्तकांमधून मुघल राजवंश काढून टाकणे हास्यास्पद : रोमिला थापर

SHARE:

नवी दिल्ली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने २०२५-२६  शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ७ वी सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात दिल्ली सल्तनत आणि मुघलांबद्दलचे प्रकरण काढून टाकण्यात आले आहेत. शिवाय, ते आता मौर्य, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर तसेच विविध धार्मिक परंपरांच्या सांस्कृतिक परंपरा आणि पवित्र स्थळांवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर म्हणाल्या कि इतिहास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ती तुकड्यांमध्ये शिकवता येत नाही. त्यांनी पाठ्यपुस्तकांमधून मुघल राजवंशांना काढून टाकणे हास्यपद असल्याचे म्हटले आहे.

शनिवारी केरळ साहित्य महोत्सवाच्या नवव्या आवृत्तीत ऑनलाइन बोलताना थापर म्हणाल्या कि इतिहासाचे काही भाग अभ्यासक्रमातून काढून टाकले जात आहेत किंवा आपल्याला त्यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे, हा सर्व मूर्खपणा आहे. इतिहास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही लोकांची आणि संस्कृतींची, वागण्याच्या पद्धतींची आणि विचारसरणीची उत्क्रांती आहे.
आम्ही हे राजवंश काढून टाकतो, आम्ही मुघल काढून टाकतो, आम्ही ते काढून टाकतो, असे सांगून इतिहासाची तोडमरोड करता येत नाही. याने इतिहासाचे सातत्य तुटत नाही. यामुळे इतिहासाचे तुकडे होतात आणि त्याला अर्थहीन बनवतात. असे त्या म्हणाल्या. त्या २५ हून अधिक शैक्षणिक पुस्तकांच्या लेखिका आहेत.

सोशल मीडियावर ‘लोकप्रिय इतिहास’च्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त करताना थापर म्हणाल्या कि ते अनेकदा संशोधन-आधारित इतिहास आणि वैयक्तिक मत यांच्यातील रेषा अस्पष्ट करते. भूतकाळातील घटना समजून घेण्यासाठी व्यावसायिक इतिहासकारांच्या लेखनावर अवलंबून राहण्याचे त्यांनी लोकांना आवाहन केले.

त्या म्हणाल्या कि लोकप्रिय इतिहासकार आणि व्यावसायिक इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासात फरक आहे आणि तो फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक विधानाचा संदर्भ देताना, ते व्यावसायिक इतिहास लेखनातून येते की सोशल मीडियावर पसरलेले विधान आहे, हे जाणून घेतले पाहिजे. त्यांनी यावर भर दिला कि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांनी त्यांची स्वायत्तता सिद्ध करणे आणि आदर मागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, स्त्रीवादी इतिहास लिहिणे हे स्त्रीवादीसारखे वागण्याइतकेच महत्त्वाचे आहे, म्हणजेच स्वातंत्र्य, टीकात्मक विचार आणि बौद्धिक स्वातंत्र्यासाठी उभे राहणे.

थापर म्हणाल्या कि महिलांनी त्यांची स्वायत्तता सिद्ध करणे आणि व्यावसायिक क्षेत्रात आदर मागणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी भर दिला. त्यांच्या मते, स्त्रीवादी इतिहास लिहिणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच स्त्रीवादीसारखे वागणे म्हणजेच स्वातंत्र्य, टीकात्मक विचारसरणी आणि बौद्धिक स्वातंत्र्यासाठी उभे राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चार दिवसांच्या साहित्य महोत्सवात ४०० हून अधिक वक्त्यांनी भाग घेतला.

Leave a Comment

अधिक वाचा

नागपुरात एका NGO मध्ये हैराण करणारी घटना समोर आली आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेच्या कपाळावर किस करण्याचा प्रयत्न केला आणि तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत!