पश्चिम बंगाल – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी रविवारी भाजपचा राजीनामा देऊन सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात या मोठ्या उलथापालथीमुळे खळबळ उडाली आहे. चंद्र कुमार बोस यांचा टीएमसीमधील प्रवेश हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षासाठी एक मोठा राजकीय फायदा मानला जात आहे, तर भाजपला हा एक मोठा धक्का ठरला आहे.
टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर चंद्र कुमार बोस म्हणाले की ते आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या सहकार्याने बंगालच्या जनतेची सेवा करतील. ते म्हणाले कि भाजपमध्ये सामील होणे ही एक ऐतिहासिक चूक होती, पण मला हे उशिरा का होईना पण कळले. निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांमध्ये फूट आणि ध्रुवीकरण करणे हाच जर एखाद्या पक्षाचा एकमेव उद्देश असेल, तर ते मला मान्य नाही. जातीयवादाचा सामना जातीयवादाने करता येत नाही.
राष्ट्राची एकता जपण्यासाठी आपण सर्व समुदायांना एकत्र आणूया.
चंद्र कुमार बोस यांनीही अलीकडेच पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरावलोकनावर तीव्र टीका केली. त्यांनी दावा केला की राज्यातील अनेक खऱ्या मतदारांसह सुमारे ९० लाख लोकांनी मतदानाचा हक्क गमावला आहे. त्यांनी नागरी समाज, सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारांच्या लोकांना आवाहन करत प्रश्न केला कि बंगालच्या नागरी समाजाला, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि समविचारी पुरोगामी विचारांच्या लोकांना काय झाले आहे? तुम्ही आंदोलन करणार नाही का? उठा, जागे व्हा आणि आपले ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. बंगालची क्रांतिकारक जनता हा अपमान मुकाट्याने सहन करणार नाही.
बोस यांनी एसआयआर प्रक्रियेला पूर्णपणे घटनाबाह्य आणि अलोकतांत्रिक म्हटले आणि निवडणूक आयोगावर भाजपला अनुकूलता दर्शवल्याचा आरोप केला. ६ एप्रिल रोजी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की संपूर्ण एसआयआर प्रक्रिया आणि त्यानंतर पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे घटनाबाह्य आणि अलोकतांत्रिक होती. प्रचारादरम्यान शांतता राखण्यास निवडणूक आयोग पूर्णपणे असमर्थ होता. आता आचारसंहिता लागू असताना कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची आहे? त्यांनी निवडणूक आयोगाला अक्षम म्हटले. ते म्हणाले कि आयोग आपल्या मालकांच्या सूचनांचे पालन करून निष्पक्ष निवडणुका घेऊ शकला नाही.
चंद्र कुमार बोस म्हणाले की भाजप धर्म आणि समुदायाच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचा एकच अजेंडा आहे कि समाजात फुट पाडून त्यांच्यावर राज्य करणे. हेच धोरण ब्रिटिशांनी अवलंबले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे थोरले बंधू शरतचंद्र बोस यांनी अशा विभाजनकारी राजकारणाला नेहमीच विरोध केला आहे. ते पुढे म्हणाले की ते भाजपची विचारधारा स्वीकारू शकत नाहीत म्हणूनच त्यांनी पक्षापासून स्वतःला दूर केले आहे.
जेव्हा चंद्र कुमार बोस भाजपमध्ये सामील झाले, तेव्हा पक्षाने त्यांना एक प्रमुख चेहरा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांना भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती. भाजपने बोस घराण्याचा वारसा आणि नेताजींचा करिष्मा याला बंगालमधील आपले अस्त्र मानले होते. पण आता, तेच चंद्र कुमार बोस ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.
माहित असोव कि पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५२ जागांसाठी २३ एप्रिल रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात १४२ जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होईल. ४ मे रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर होतील.





