सुप्रीम कोर्टाचे आदेश: TET प्रमाणपत्र नसलेल्या २० लाख शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात

SHARE:

नवी दिल्ली – सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याच्या प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे देशातील सुमारे 25 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका फेटाळल्यानंतर टीईटी उत्तीर्ण न झालेल्या लाखो शिक्षकांची चिंता वाढली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे देशभरातील 20 लाखांहून अधिक शिक्षक प्रभावित होणार आहेत.

सर्वाेच्च न्यायालयाने शुक्रवारी, देशभरातील कार्यरत शिक्षकांना दिलासा देण्यास नकार दिला आणि त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. सर्वाेच्च न्यायालयाने टीईटी अनिवार्य घोषित करून, सेवेत राहण्यासाठी परीक्षा उत्तीर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट, 2028 पर्यंत वाढवली.यानंतर मुदतवाढ मिळणार नाही.

न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि मनमोहन सिंग यांच्या खंडपीठाने, अंजुमन इशात-ए-तालीम ट्रस्ट प्रकरणातील सर्वाेच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी करणाऱ्या अनेक राज्य सरकारे, शिक्षक संघटना आणि वैयक्तिक शिक्षकांनी दाखल केलेल्या 65 हून अधिक याचिका फेटाळून लावल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो प्राथमिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह विविध राज्यांमध्ये असे लाखो शिक्षक आहेत जे टीईटी उत्तीर्ण न होता अनेक वर्षांपासून शाळांमध्ये शिकवत आहेत. आता, या शिक्षकांना तीन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांना एकतर राजीनामा द्यावा लागेल किंवा सक्तीच्या सेवानिवृत्तीला सामोरे जावे लागेल.

या कठोर निर्णयातून केवळ पाच वर्षांची सेवा शिल्लक असलेल्यांनाच सूट मिळेल. पण जर त्यांना पदोन्नती हवी असेल, तर त्यांनाही टीईटी उत्तीर्ण करावी लागेल. परिणामी, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी, कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पुनर्विलोकन याचिका दाखल केल्या आहेत. हे प्रकरण अशा शिक्षकांशी संबंधित आहे ज्यांची नियुक्ती आरटीई एक ॲक्ट 2009 लागू होण्यापूर्वी झाली होती आणि त्यांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा